PM किसान – करा स्वतःच नोंदणी आणि मिळवा ६ हजार रूपये

PM किसान – करा स्वतःच नोंदणी आणि मिळवा ६ हजार रूपये
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी ६ हजार रूपयांचे अनुदान मिळवण्यासाठी वैयक्तिकरित्या शेतकरीही नोंदणी करू शकतात. महाराष्ट्रातील जवळपास ६ लाख शेतकऱ्यांनी अशा प्रकारे नोंदणी केली असून अशा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम देखील जमा झाली आहे.


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत चुकलेल्या नावाची दुरुस्तीदेखील शेतकरी स्वतः करू शकतात. केंद्रीय कृषि मंत्रालयाने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर थेट विश्वास दाखवला असून शासकीय यंत्रणेच्या मदतीशिवाय शेतकरी स्वतःच नोंदणी करून थेट बॅंक खात्यात अनुदान मागवून घेत आहेत.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्याकरिता थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी pmkisan.gov.in संकेतस्थळावर फार्मर कॉर्नरवर नवीन नोंदणी या लिंकवर थेट अर्ज भरता येतो. अर्जाची भाषा इंग्रजी असली तरी अर्जाची रचना सोपी आहे, त्यामुळे राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात स्वतः नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असली तरी इंटरनेट साक्षरता वाढीसाठी देखील ही योजना उपयुक्त ठरत आहे. (वरील नवीन नोंदणी शब्दावर क्लिक केल्यास, थेट फॉर्म भरण्याच्या लिंकवर पोहचाल)
नवीन सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रूपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. नावात चुक झाल्यास दुरूस्ती करता येत आहे. तसेच या योजनेतील आपल्या सहभागाची सद्यस्थिती देखील शेतकऱ्याला समजत आहे. या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नरमध्ये पाच पर्याय देण्यात आले असून त्यात नवे शेतकरी नोंदणीआधार क्रमांक दुरुस्तीशेतकऱ्याच्या अनुदानाची सद्य:स्थिती, लाभार्थ्यांची यादी, स्वतः किंवा सीएससीमधून केलेल्या नोंदणीची सद्य:स्थिती असे पाच पर्याय देण्यात आले आहेत. गरजेनुसार शेतकऱ्यांने पर्यायाची निवड करून आपली माहिती जमा करणे गरजेचे आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या नवीन  नोंदणीसाठी क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याला त्याचा आधार नंबर टाकावा लागतो. त्यानंतर शेजारी येणारा कॅप्चाकोड भरून द्यावा लागतो. अगोदर नोंदणी झाली असल्यास स्क्रीनवर तसा संदेश दाखविला जातो, अथवा नोंदणी झालेली नसल्यास थेट अर्ज उघडला जातो. याठिकाणी राज्य निवडून आपल्या गावाची माहिती भरल्यावर शेतकऱ्याला स्वतःचे नाव टाकावे लागते.  त्यानंतर कॅटेगिरीत पुन्हा जनरल, एससी किंवा एसटीवर क्लिक करावे लागते. यानंतर जमीनधारणा एक-दोन हेक्टरपर्यंत आहे की त्यापेक्षा वेगळी असे पर्याय येतात. ते क्लिक केल्यानंतर बॅंकेचा आयएफसी कोड व बॅंकेचे नाव, अकाऊंट नंबर टाकल्यास शेजारी ‘सब्मिट फॉर आधार ऑथिन्टिकेशन’ असा पर्याय येतात. तेथे क्लिक केल्यानंतर पुढे मोबाईल नंबर, जन्मतारिख व वडिलांचे नाव टाकावे लागते.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज भरताना सातबारा वैयक्तिक (सिंगल) आहे की सामायिक (जॉईंट) आहे यावर क्लिक करावे लागते. शेतकऱ्याला पुढे त्याचा सर्वेनंबर विचारला जातो. तो भरल्यानंतर डाग किंवा खासरा नंबर विचारला जातो. मुळात ही संज्ञा आपल्याकडे नसून उत्तर भारतातील असल्याने शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी शून्य टाकावे. पुढे आपले क्षेत्र टाकून अॅड या पर्यायाला क्लिक केल्यानंतर ‘मी ही माहिती खरी असल्याचे घोषणापत्र लिहून देत आहे’ अशी ओळ येते, त्याच्या पुढे क्लिक करून ‘सेव्ह’ पर्याय दाबला की, शेतकऱ्याचा अर्ज पोर्टलवर नोंदणीसाठी पुढे जातो.
  • शेतकरी घर बसल्या नोंदणी करू शकतात. 
  • किसान सन्मान योजनेत नोंदणी किंवा दुरुस्ती करण्यापूर्वी आधार नंबर, बॅंक खाते पुस्तक आणि सातबारा उतारा तयार ठेवावा.
  • इंटरनेट सुविधा नसल्यास गावातील आपले सरकार सेवावर केंद्रावर (सीएससी) फक्त १५ रुपये शुल्क देऊन नोंदणी करता येते.
  • दुरुस्तीसाठी केवळ १० रुपये शुल्क असून कोणत्याही सीएससीचालकाने जाद रक्कम आकारल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करता येते.
इथंपर्यंत शेतकऱ्यांने अर्ज भरण्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर पुढची जबाबदारी तलाठी कार्यालयावर येते. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने आपला सातबारा, खाते पुस्तकाची प्रत आणि आधारनंबरची नक्कल यांच्या ‘हार्डकॉपीज’  झेरॉक्स आपल्या गावच्या तलाठी कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांच्या अर्जावर पुढील प्रक्रिया केली जाते. कारण, राज्य शासनाने शेतकरी सन्मान योजनेची ग्रामपातळीवरची माहिती संकलित करण्याची जबाबदारी तलाठ्याला दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जासाठी भरलेल्या नोंदीच्या वरील तीन कागदांच्या प्रती तलाठ्याच्या ताब्यात देऊन त्या मिळाल्याची ‘पोच घेऊन ठेवणे’ अत्यंत गरजेचे आहे. ही पोच कालांतराने आपण तलाठी कार्यालयाकडे या योजनेसाठी कागदपत्रे जमा केली असल्याचा पुरावा म्हणून उपयोगी पडू शकते.
शेतकऱ्याने केंद्र शासनाच्या पोर्टलवर जाऊन शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज भरल्यानंतर हे अर्ज पुढे तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयातून संबंधित गावच्या तलाठ्याकडे तपासणीसाठी येतात. शेतकऱ्यांने भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री करण्याबरोबरच अर्ज बोगस नसल्याची पडताळणी देखील केली जाते. पुढे ही यादी तहसीलदार पातळीवरून अंतिम केली जाते. आणि पुढे हीच माहिती दिल्लीत केंद्र शासनाकडे पाठविली जाते. केंद्र सरकारला ही यादी प्राप्त झाल्यानंतर राज्यातल्या कोणत्याही यंत्रणेला मध्यस्थी न ठेवता सदर यादीनुसार थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात दोन हजारांची रक्कम जमा होते.PM किसान – करा

Comments

Popular posts from this blog

खो गया आधार कार्ड और मोबाइल नंबर भी रजिस्टर्ड नहीं तो दूसरा कैसे प्राप्त करें

राज्य सरकारचा मोठा निर्णय: निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना मिळणार 3 महिन्यांचं आगाऊ अनुदान 2020

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना: PMGKY एप्लीकेशन फॉर्म, ऑनलाइन आवेदन व लाभ